Tuesday 30 May 2017

One Day at a Time

या आधीचा पोस्ट लिहिला आणि थोड्याच दिवसांनी "नेटफ्लिक्स" वर "One Day at A Time" नावाची एक अमेरिकन  सीरियल पहायला मिळाली. अमेरिकेतल्या शहरात राहणाऱ्या मूळच्या क्युबा या देशीच्या असलेल्या एका बाईची आणि तिच्या कुटुंबाची ही गोष्ट ही सीरियल हलक्या फुलक्या रुपात विनोदी ढंगाने सांगते. मध्यमवर्गीय बाईची एकटीने घर सांभाळताना , मुलं  वाढवताना होणारी कसरत , त्यातून तिच्या घरात घडणाऱ्या गमती जमती ह्या सगळ्यांची गोष्ट ही सीरियल नावाप्रमाणे अगदी One Day at A Time.. सांगते. रोज नवा दिवस आणि नवी गोष्ट. ही बाई एक अनुभवी नर्स आहे. नवऱ्यापासून वेगळी राहतेय. दोन टीन एजर  मुलांची आई आहे. स्पॅनिश एक्सेंट मध्ये बोलणारी , आपल्या क्यूबन परंपरा आपण जपल्या पाहिजेत असं मानणारी , तिकडच्या आठवणीत रमणारी तिची वयस्कर आईसुद्धा तिच्या बरोबरच राहतेय. या बाइचा एक Single Mother म्हणून , बजेट वर घर चालवणारी मेहनती नर्स म्हणून , टिन एजर्स ची आई म्हणून आणि एक दुसऱ्या पिढीतली क्यूबन स्थलांतरित म्हणून....असा सगळ्या प्रकारचा तिचा स्ट्र्गल आणि त्यातून होणारी गंमत  असं सगळ खूप छान येतं सीरियल मध्ये. 
सहज म्हणून या सीरियल बद्दल नेटवर  शोधलं तर The New York Times मधला एक लेख वाचायला मिळाला. "नुक्कड़" किंवा इतर 80's मधल्या सीरियल बघताना जे जाणवलं होतं तेच या लेखातही म्हटलय. त्यांच  असं म्हणणं आहे कि अमेरिकेतही ७० च्या दशकामध्ये टी.व्ही सीरियल्स मध्ये अशा "Paycheck to Paycheck" किंवा आपल्या टर्म्स मध्ये "कट टू कट " बजेट वर जगणाऱ्या लोकांच्या गोष्टी असायच्या. पण नंतर जसजशी लोकांच्या उत्पनामधली दरी वाढत गेली तसतशी ही  "वर्किंग क्लास " मधली लोकं टी.व्ही. सीरियल्सच्या गोष्टींमधून दिसेनाशी झाली. त्यांनी पुढे असंही म्हटलय कि जाहिरातींचे दर अधिक असल्यामुळे कमी उत्पन्न असणारे दर्शक टी.व्ही. सीरियल्सकरिता कमी फायद्याचे आणि कमी महत्वाचे ठरत गेले. आणि मग सीरियल्स मध्ये "White Collar" पात्रं  आणि त्यांच्या गोष्टी याच अधिक करून दिसायला लागल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी या "One Day at a Time" चं खूपच स्वागत केलंय. या सीरियलच्या निमित्ताने अमेरिकन लोकांनी आपल्यातील  वर्गाने , वंशाने वेगवेगळ्या असलेल्या लोकांना आणखी  चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करुया असंही या लेखात म्हटलंय. 

आपला देशतर पावलो पावली विविधतेने नटलेला आहे .. आपल्याकडे  असा एकमेकांचं  वेगळेपण समजून  घेण्याचा प्रयत्न होतोय का.. आपल्या रोजच्या  जगण्यात आणि रोज आपण घरा घरांतून बघतो त्या सीरियल्स मधूनही...?

Thursday 13 April 2017

हरवलेली माणसं : सीरियल मधली आणि आजु-बाजूची

 पूर्वीच्या काही  मराठी - हिंदी टि. व्ही सिरियल्स किंवा अगदी फिल्म्स सुद्धा आपल्या रोजच्या जगण्याशी किती जवळच्या असायच्या. एकदा YouTube वर एक जुनी "नुक्कड" नावाची टि . व्ही सिरीयल  बघत होते. मला वाटतं  "नुक्कड" ऐंशीच्या दशकातली असावी ,  बहुतेक माझ्या जन्माच्या आधीचीच. सीरियल मधली पात्रं  म्हणजे त्यावेळच्या मुंबईतली चाळीत राहणारी , देशभरातून कुठून कुठून कामधंद्यासाठी मुंबईत येऊन राहिलेली साधिसुधी माणसं. वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या प्रांतातून आलेली. प्रत्येकाची भाषा वेगळी आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचा क्लास पण वेगळा. कोणी हात काळे करणारा मेकेनिक तर कोणी चांगलं कमावणारा व्यापारी, कोणी साधा चहावाला. त्यातच बऱ्यापैकी पगार असलेला पण  या सगळ्यांबरोबरच राहणारा कोणी नोकरदार आणि एखादी घरकाम करणारी बाई , एखादा बैंड वाला सुद्धा. नुक्कडमधली ही पात्र किती साधी होती   आणि तरीही ती मला  रंगीबेरंगी वाटली . त्यांना बघताना असं जाणवलं कि हल्लीच्या किंवा थोड्या पूर्वीच्या सीरियल मध्ये कुठे असतात अशी माणसं. आता आपण बघतो त्या सिरिअल्स मधली माणसं कोण असतात.. जुन्या अवंतिका मधल्या दीक्षित सरांसारखी शिक्षक, लेक्चरर , प्रोफ़ेसर वगैरे  असतात, किंवा हल्लीच्या "जुळून येती रेशिमगाठी " मधल्या आदित्य सारखी सी.ए असतात. किंवा  "काहे दिया परदेस" मधल्या गौरी सारखी बँकेत काम करत असतात. डॉक्टर - इंजीनियर असतात, थोड़ी वेगळी गोष्ट असेल तर  पत्रकार, वकील, डान्सर , रेडियो जॉकी , नट वगैरे असतात. गृहिणी तर असतातच, कॉलेजला जाणारी मुलं असतात. पण शक्यतो सगळे शिकलेले, सोफेस्टिकेटेड वगैरे. सगळीच एका ठराविक क्लास मधली. फ्लैट मध्ये किंवा बंगल्यामध्ये राहणारी, स्वत:ची  कार असणारी वगैरे  वगैरे.. मग "नुक्कड़" मध्ये धमाल करणारी ती बाकीची माणसं गेली कुठे? म्हणजे तो मेकानिक , चहावाला , पेपरवाला, कामवाली बाई, भाजीवाली , कचरावाला,ऑफिस मधला शिपाई , रिक्शावाले काका, वॉचमन , नाहीतर एखादी नर्स सिस्टर,किराणा दुकानदार,मॉल मधला सेल्स बॉय....असली सगळी माणसं सीरियल्स मधून कुठे गेली...हल्लीच्या सीरियल्स मधल्या सोफेस्टिकेटेड वगैरे पात्रांच्या गोष्टींमध्ये आता फारशी दिसत नाहीत ही माणसं. रिक्शावाले काका किंवा चाळीतल्या जुन्या घरात राहणारे रिटायर्ड वडील हे गोष्टींमध्ये तेव्हाच असतात जेव्हा त्यांच्या  मुलीची  किंवा मुलाची  एखाद्या श्रीमंत मुलाशी किंवा मुलीशी लव्हस्टोरी होणार असते.  कामवाल्या मावशी किंवा वॉचमन  गोष्टीत तेव्हाच असतात जेव्हा ती सिरिएल एखादी डिटेक्टिव / क्राइम / वगैरे सस्पेन्स वर आधारित असते. पण असं का व्हायला लागलं असेल? कुठे हरवली ही माणसं सीरियल मधली....

असो,...टी.व्ही सीरियल्स ची गोष्ट बाजूला राहु दे थोड़ा वेळ. पण माझ्या रोजच्या जगण्याच्या गोष्टीत तरी कुठे आहेत आता  ही  माणसं ? आठवायला गेलं तर फार तर मला आमच्या घरी मी लहान असल्या पासून  येणाऱ्या आजी आठवतात, रिक्षाने शाळेत सोडणारे काका आठवतात. अशी कितीतरी माणसं माझ्या ओळखीतूनही हरवलेयत. म्हणजे ती  आजूबाजूला आहेत,  माझं काम असतं त्यांच्याकडे, दिसतात ती. पण  आता मी त्याना पर्सनली ओळखत नाही, नावाने ओळखत नाही. त्यांचं घर कुठे आहे मला माहीत नसतं, घरी जाणं तर दूरच.
पण लहानपणी ही माणसं माझ्या रोजच्या गोष्टीतली पात्रं असायची. एखादे रिक्शावाले काका शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहत असायचे , घरी कामाला ज्या आजी यायच्या त्यांच घर माहीत असायचं , मी त्यांच्या घरी जाऊन  आलेले असायचे. फार नाहीतर यातल्या कुणाची तरी मुलगी माझी शाळेतली मैत्रीण असायची. अगदी  माझ्या वर्गात नसली तरी घरी येता जाता बस - रिक्षा मधली मैत्रीण असायची.

एकूण काय तर  मी लहानाची मोठी होता होता जी वर्षं गेली त्यात  ही सगळी आजु-बाजूची माणसं हरवलेयत। ... माझ्या रोजच्या जगण्याच्या गोष्टींतून  आणि टीव्ही सिरियल्सच्या गोष्टींमधूनही ! 

Monday 5 August 2013

When was the last time...


Here is something I had written long back during my college days. Some lines of it bring me memories of those days, and some I still feel are so true for me. I remember, having come across a line from Tagore's poem which I liked a lot...something like...When was the last time....and I thought of something which is this....

When was the last time you walked barefoot on moist soil
after showers of rain........
When was the last time you splashed rain water on the street
not worried about your white clothes.......
When was the last time you walked in the rain
not caring about catching cold..
When was the last time you trekked up a mountain
just to feel the cool breeze  on your face..
When was the last time you almost had tears in your eyes
because someone else was sad..
When was the last time you felt the rush of adrenaline in your blood,
and wanted to fight for what you believe in,
and felt you could really make a difference..
When was the last time you punched in the air
shouting a big "YES!!!!" WITH JOY,
just to celebrate the moment when you’ve finally solved some tricky maths problem..
Or just because you finally got the thing,
Which the great author of the book was trying to tell you for hours..
and broke the silence in the library..
and returned the glances with a smile..
When was the last time you wished you had wings to fly
To go and meet someone so close to your heart but far away from you..

When was the last time you wished you could write a poem to say what you want to..

Sunday 21 July 2013

Wish I could Send you a Miss u Text

The last few days have been my best days with her so far.
Having her with me all day long..
Having her so close …to share my room and many other things..
As close as she has been to my heart always..
Sharing thousands of moments of feeling the softness in everything about her..
Softness,
Of the touch of her hand,
Of the look in her eyes waiting to see me returned from work,
Softness,
In the feel of her cotton Saree,
Of the colours of every single thing that belongs to her.
Softness of her heart that makes her feel so genuinely for everyone, including the fictitious characters in her favourite T.V serials,
Softness of ice-cream that she loves and which makes her go naughty like a kid,

Softness of Ghee-Rice, of the Raita which she shares with me from her plate,
Softness of the tooth-less smile that bubbles up on her face as I listen to her childhood stories..
Softness of her trusted Ayurvedic lotion that she would put on my eyes on a tired evening…

Aajee (My Grandmother) was here to stay with us for a few days and as the day she has to go back to her place comes nearer…I lay my head on her lap feeling the softness of her fingers moving in my hair….not a word between us and yet I know she has understood that I am going to miss her…


Tonight, when she has gone back home,
Alone in my room….awake till late,
I miss the softness in her voice,
When she would have asked me to keep the pen down and go to bed…

The feeling is a little weird, but I wish Aajee had a cellphone 
and I could, at this very moment, send her a “Miss u” text..

Wrapped in the warmth of the Godhadi she had woven for me,
I miss getting pampered like a baby when she used to make sure that blanketful of love is spread neatly for me before I come to my bed,

And I wish she had a cellphone and I could, right now, send her a “Miss U” text,

I feel a little guilty that I need a cellphone and SMS for saying this to Aajee,
Shouldn’t there be a softer way for saying this to her,
Probably, no other way, will say as much as laying head on her lap and letting her understand how I miss her…

Got to wait for that till I meet her next…
Till then…
I wish Aajee had a cellphone

And I could send her a “Miss U” text..

Friday 7 June 2013

The rain and him..

The rain and him..
First showers of monsoon,
And he comes too,
Both are here,
As they have always been..
But the surprise and joy for me,
As has never been..

Miraculous, is it,
As the flowers are prettier,
And the greens brighter,

As I drive down the moist road,
I feel pink and lighter,
Rolling down the grey street,
Like a bougainvillea flower..


Tiny Rain-tree leaves,
Shower over me,
Magical, is it,
Like in a movie..

Strange, the traffic lights seem so lovable,
And I want to go slow, slow and slow ...

Is it the rain or him,

I still don’t know..

Friday 19 April 2013

जाणीव


           काही माणसं, काही ठिकाणं, काही अनुभव आपल्याला आपल्याच मनाच्या काही कोपयांची जाणीव करून देतात....असे कोपरे जे आहेत हे ही पूर्वी कधी नीटसं जाणवलेलं नसतं.....काही माणसं, काही ठिकाणं , काही प्रसंग जेव्हा आपल्या मनाचे असे कोपरे उजेडात आणतात तेव्हा अचानक काही जाणीवा खूप ठळक होतात....इतक्या कि सगळीभर....रस्त्याने येता जाता....लोकांशी बोलताना.....पेपर वाचताना....बातम्या पाहताना.....सगळीकडे......जणुकाही कोणीतरी मला काही ठराविक गोष्टी मुद्दाम "बोल्ड" करून "हायलाईट" करून दाखवतंय असं वाटायला लागतं..... स्ट्रेंज! आजूबाजूचं जग तेच असतं जे मी पूर्वी पाहत असते, वाचत असते....पण आता मला त्याची काहीशी वेगळी ओळख होते....."बार्टी" मध्ये जॉईन झालेय तेव्हापासून माझ्या जगाचं असंच काहीसं "बोल्ड-हायलायटिंग" झालं असावं......थोडं भानावर आणणारं, खडबडून जागं करणारं, कधी कधी खूप अंगावर येणारं, आणि बयाचदा थोडं अपराधी वाटायला लावणारं......
एकूणच जातिव्यवस्थेच्या उतरंडीबद्दलची, माझा-जन्म-कुठल्या-घरात-झाला-यावर-माझं-स्थान-ठरणार याबद्दलची चीड तर मला कळायला लागलं तेव्हापासूनच होती.....मी ब्राह्मण नाही हे कधी आडनावावरून, कधी खाण्यापिण्याच्या सवयींवरून तर कधी आणखी कशावरून कळल्यानंतर होणारं Between the Lines Discrimination मी ही अनुभवलं होतंच....ते पूर्वी खूप चीड आणायचं...मग हळुहळु त्याचं नुसतंच वैषम्य वाटायला लागलं आणि आता आता तर लोकांच्या अशा वागण्याची नुसतीच कीव वाटते. पण अजूनही आपल्या आसपास , समाजात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या वाट्याला या जातिभेदाचा अनुभव असा नुसता Between the Lines न येता स्पष्ट ठळक अक्षरात येतोय, सारखा येत असतो....हे किती सिरियस आहे....ब्राह्मण घरात जन्म नाही झाला म्हणून तसं माझं तर फ़ार काही बिघडलं नाही कधी.....मागच्या पिढीपासून सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळालं, आर्थिक स्थिती बरी होती, खया अर्थाने पुढारलेले विचार पोहोचले, शहरातलं एक्स्पोजर मिळालं त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी upward mobility  कितीतरी सोपी झाली. मी खूप नशीबवान ठरले खरंतर. पण अजून बराच मोठा समाज आहे ज्याला हे शक्य झालेलं नाहिये. अगदी त्या समाजातल्या माझ्या वयाच्या, माझ्या लहान भाऊ-बहिणीच्या वयाच्या मुलांनासुद्धा अजून यातलं काहीच मिळालं नाहीये. In fact, त्यांना तशी संधी मिळायला अनुकूल वातावरण व्हावं म्हणून माझ्यासारख्या घरातल्या लोकांनी पुरेसं काहीच केलं नाहिये. काही करणं तर सोडाच, पुरेशी जाणीवही नाहिये आपल्याला...आणि यात नक्की काहीतरी चुकतय.....Something is seriously wrong here...
आतापर्यंत मागासवर्गीय आणि दलित वगैरे म्ह्टलं तर एक डॉ. बाबासाहेब आंबेड्कर आणि त्यांच्या विषयीचा आदर वगळता आपल्या समाजाचा एक मोठा भाग म्हणून प्रातिनिधिक असं काय यायचं डोळ्यांपुढे तर.....एखाद्या राजकिय पक्षाचे होर्डींग, जयंत्यांचे फ़लक, त्यादिवशी चौकाचौकात चालणारा नाच-गाण्यांचा धिंगाणा...अडलेलं ट्रॅफ़िक....आणि या सगळ्यामुळे मनात येणारी थोडीशी तिरस्काराची थोडी दुर्लक्ष करावसं वाटण्याची भावना. पण वरकरणी बघता एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट अगदी क्षुल्लक, झिडकारून टाकावसं वाटणारी असली तरी काही वेळा आपण त्या गोष्टीची, त्या मागची "स्टोरी" समजून घेतली कि एकदम जाग झाल्यासारखं वाटतं, स्वच्छ दिसायला लागतं..तसं माझं याबाबतीत झालंय....अशा कुणाची स्टोरी समजून घेण्याची मला कधी संधी आली नव्हती म्ह्णा किंवा मीच कधी त्या फ़ंदात पडले नव्हते किंवा मला तशी कधी गरज वाटलीच नाही म्हणा.....बार्टी मध्ये जॉईन झाले आणि माझ्या या सगळ्या जाणीवा जाग्या करणारा अनुभव लवकरच आला. संस्थेने मेहेतर समाजाचा मेळावा आयोजित केला होता आणि तिथे जमलेल्या प्रतिनिधींकडून माहिती गोळा करायची , त्यासाठी मुलाखती घ्यायचं तसं छोटंच काम होतं.  अशा मुलाखती घेणं खरंतर इंटरेस्टिंग असतं....because you get to know the story of  people who are otherwise complete strangers to you.
मेहतर समाज म्हणजे मागासवर्गीयांमधला अजूनही सर्वांत मागास असलेला समाज. पूर्वीपासून माणसांची विष्ठा गोळा करणं, शौचालयं साफ़ करणं हेच काम करत आलेला हा समाज. आणि दुर्दैवाने अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे अजूनही या समाजातले बरेचसे लोक हेच काम करतात...सफ़ाई कामगार म्हणून. नगरपालिकांचे सफ़ाई कर्मचारी, कचरा गोळा करणारे, ड्रेनेज लाईनमध्ये उतरून स्वच्छता करणारे, गटारं साफ़ करणारे हे सगळे अजूनही याच समाजाचे लोक आहेत. त्यांच्या प्रश्नांबद्दळ थोडं अनिल अवचटांच्या लेखांमध्ये वाचलं होतं, थोडं अतुल पेठेंचा "कचराकोंडी" पाहिला तेव्हा कळलं. पण कधी या समाजातील कुणाशी त्यांच्या मेहतर समाजाचं असण्याच्या identity सकट सामोरं जायचा प्रसंग आला नव्हता. खरंतर मला थोडं टेन्शनच होतं कि माहितीसाठी मुलाखत घेताना माझं काही चुकणार तर नाही ना ...त्यांना न दुखावता काही कठीण प्रश्न विचारता येतील ना....मी आधीच ठरवलं होतं कि शक्यतो तरुण मुला-मुलींशी बोलायचं. कारण एकतर त्यांच्याबरोबर माझी Comfort Level जास्त असेल आणि मागासवर्गीय तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणं हेच माझं काम असल्यामुळे मला थोडं समजूनही घेता येईल कि या मुलांना नेमकं काय मिळालं पाहिजे, कुठे आपण कमी पडतोय....वगैरे.
सध्या कॉलेज शिकणाया या सगळ्या मुलामुलींचे आई-वडील त्याच पारंपारिक कामात होते..शहरात सफ़ाई कामगार किंवा गावात मेहतरीचं काम करणारे. मला कल्पना असूनही का कुणास ठाऊक पचवायला जड जात होतं.   आपल्या आईला, बाबांना अजूनही हेच काम करावं लागतं हे ही मुलं किती सहज सांगत होती....म्हणजे उद्या जर यांना दुसरं योग्य काम नाही मिळालं तर ते सुद्धा झाडूच घेणार हातात. आई काय काम करते? असं मी विचारल्यावर, "मम्मी मेहतरी का काम करती है और क्या करेगी?" असं उत्तर देत थोडं आश्चर्यानेच माझ्याकडे बघणारा तो मुस्लिम मेहतर समाजातला १८-१९ वर्षांचा मुलगा. कदाचित मला लहान भाऊ असता तर आज त्याच्या एवढाच असता....दोन-तीन वर्षांनी हा बी.ए होईल. मराठ्वाड्यात त्याच्या गावाकडे कसली नोकरी मिळेल त्याला? नोकरी तरी मिळेल का?... नाही मिळाली तर...धंदा टाकण्याएवढे पैसे त्याच्या आईकडे नसणार. शेवटी तो काय करेल..कदाचित झाडू घेईल हातात....विचारानेच माझ्या अंगावर काटा आला.
इतकी वर्षं झाली आपल्या स्वातंत्र्याला पण अजूनही या लोकांना कुठे मिळालाय चॉईस? एकीकडे माझ्यासारख्या घरातली मुलं मुली आहेत कि ज्यांना त्यांच्या "चॉईस" साठी इंजिनीयरींग/मेडिकल सारखी सो-कॉल्ड उज्ज्वल भविष्य असणारी करियर सोडून आपल्या आवडीचं काम करण्याची चैन परवडू शकते आणि दुसरीकडे ही मुलं ज्यांना हे पारंपारिक काम सोडून दुसरं काही काम निवडण्याचा बेसिक पर्यायसुद्धा नाहीये. आपण ठेवलाच नाहीये.
या मुलापेक्षा थोड्या मोठ्या आणि बयाच मॅच्युअर्ड असेलेल्या दोघी बहिणी. वडिल पुणे महानगरपालिकेत सफ़ाई कामगार. आई वडील फ़ार न शिकलेलेच पण या दोघीजणी माझ्या प्रश्नांना उत्तर देताना कितीतरी विषयावर आपली प्रगल्भ मतं किती नीटनेटकी मांडत होत्या. आमच्या समाजातल्या मुलींनी कसं सुधारायला हवं, त्यांची लग्नं लवकर होता कामा नये, त्यांनी शिकायला हवं, व्यसनाधीनता कशी कमी व्हायला हवी इथपासून ते आपण शिकल्यावर समाजातल्या इतरांसाठी काहीतरी करावसं वाटतं, तसंच इतर प्राणिमात्र, निसर्ग यांना जपण्याची आपली जवाबदारी किती महत्त्वाची आहे इथपर्यंत.
तिचं बोलणं ऐकल्यावर मला वाटलं सगळ्याप्रकारे Advantage असलेल्या परिस्थितीत मोठं होऊन पैसा आणि स्टेटस देणारा जॉब मिळाला म्हणजे आपण खूप अचिव्ह केलं असं वाटून घेणारी आणि स्वत:च्या पलीकडे इतर सगळ्यांसाठीच्या जाणिवांना "ब्लॉक" करून जगणारी माझ्या  पिढीतली लोकं....ती "मागास" आहेत कि ही मुलगी?
माझं सगळं विचारून झाल्यावर तिलाही काही प्रश्न होते. मी पुढे काय शिकू, नोकरी कशी मिळवू, त्यासाठी काय करू, कुठे जाऊ? मला जमतील तशी मी तिला माहिती दिली, उत्तरं दिली. त्यावर तिने सांगितलं " मॅडम, असं आम्ही बाहेर कुणाला काही विचारलं तर नीट काही सांगत नाहीत हो. त्यांना जर माहित असेल आम्ही मेहतर आहोत मग तर मुळीच नाही." अशी वागणूक आपल्या पिढीतल्या मुलांनाही मिळत असेल अजूनही....मला खरंच वाटलं नव्हतं. थोड्या फ़ार फ़रकाने प्रत्येक मुलाची किंवा मुलीची ही अशीच किंवा यापेक्षाही कठीण "स्टोरी". ऐकून मनात खूप कालवाकालव झाल्यासारखं वाटत होतं. पण याच मेळाव्यात याच समाजातले काही स्वयंस्फ़ूर्तीने जमलेले अतिशय चळवळे, धडपडे लोक पाहिले. मेहतर समाजातले असूनही शपथ घेऊन झाडू हातात न घेणारे व जिद्दिने हॉटेल व्यवसाय करणारे, आपली पत्नी आपल्या पेक्षा अधिक शिकलेली उच्चशिक्षित असल्याचं अभिमानाने सांगणारे एक व्यावसायिक गृहस्थ, मेहतर समाजातल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल पोटतिडिकीने बोलणारी, त्यांचं प्रतिनिधित्व करणाया जेमतेम २-३ महिलांपैकी असूनही धीटपणे आणि वेळप्रसंगी अग्रेसिव्ह होऊनही स्टेजवर बोलणारी, श्रोत्यांमधल्या काहींच्या हुल्लडबाजीला सामोरं जाऊन त्यांना काही कठीण प्रश्न विचारायचं धाडस करणारी एक महिला डॉक्टर, मुंबईतल्या वस्त्यांमधली मुलं शाळेतून गळू नयेत म्हणून आपल्या समाजातल्या उच्चशिक्षित तरुणांचा ग्रुप करून या मुलांसाठी कोचिंग क्लासेस घेणारा एक तरुण कार्यकर्ता. आणि असे इतर अनेक लोक जे त्यांच्या समाजाचे वेगवेगळे प्रश्न खूप पोटतिडकीने आणि अभ्यास करून मांडत होते. माझ्यासाठी हा सगळाच अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता, वाटलं इतके दिवस हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत का नव्हतं. मी थोडीफ़ार या क्षेत्राशी संबंधित असून जर इतकी अजाण होते तर माझ्या पिढीतल्या इतरांचं काय? म्हणजे त्यांना चौका-चौकात चित्रविचित्र गाण्यांवर नाच करून जयंत्या साजया करणाया समाजाची त्यांच्या आजच्या पिढीची खरी स्टोरी कधी कळणारच नाही का? "ते" आणि " आपण" ही दरी कायम अशीच राहील....."ते" आणि "आपण" कधी समोरासमोर मोकळं बोलून एकमेकांची स्टोरी समजून घेतील...? इंटरनेट -सोशल नेटवर्कींग ने जग जवळ आलं म्हणतो आपण पण अजूनही समाज म्हणून आपण किती लांब आहोत एकमेकांपासून?  प्रश्न अजूनही असाच मनात रेंगाळतोय आणि थोडं उदास वाटतंय़...मघाशी मी ज्याच्याबद्दल सांगितलं तो माझा मुस्लिम मेहतर समाजातला मित्र मला एक निरागस पण त्याने पाहिलेल्या वास्तवाला धरून असलेला एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता, " मैने होटेल मॅनेजमेंट का ट्रेनिंग लिया तो क्या सहीमें मुझे किचनमे शेफ़ का काम करने देंगे? सच्चीमे?" बरंच समजावल्यावर त्याला पटलं कि हे शक्य आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला आहे हा विश्वास पटायला त्याला थोडा वेळ लागला. आता त्याचा प्रश्न आठवून पुन्हा थोडं उदास वाटतंय....पण इतक्यात त्याने मला जाता जाता विचारलेला शेवटचा प्रश्न आठवतोय " आपके के फ़ॉर्म मे ना एकही प्रोब्लेम है, मेरे पास गाय कितना है, भैंस कितना हौ, मुर्गी कितना है सब पूछा है लेकिन मेरे पास २० प्यारे कबुतर हैं उन्के बारेमें लिखने को जगह ही नही रखा! वो भी लिखो! " अशी तक्रार सांगत मिश्किल हसणारा माझा मुस्लिम मेहतर समाजातला मित्र आणि त्याचा तो निरागसपणा आठवून मन पुन्हा हलकं वाटतंय...